‘मला विचार, मी सगळी जवानी राख करून टाकली त्या यूपीएससीच्या नादात! पण साला, यूपीएससीची लत लागते, सोडवत नाही! मी आता पुस्तक लिहिणारे, ‘मन में है अविश्वास’. मिलिंद जो बोलत सुटला, तो थांबेचना!
- यूपीएससी क्रॅक करण्याच्या ध्यासानं झपाटून तारुण्य जाळणाऱ्या मुलामुलींच्या अखंड धास्तावलेल्या,अगतिक आणि चोहीकडून लुटल्या जाणा ऱ्या आयुष्याची दिल्लीच्या कुबट, गजबजत्या गल्ल्यांमध्ये कोंबून भरलेली चित्तरकथा..