त्याचा पहिला सिनेमा ‘कयामत से कयामत तक’.
आणि दुसरा ‘जो जीता वोही सिकंदर’! करिअर सेट होती बॉलिवूडमधली.
त्यात आमीर खान सख्खा चुलत भाऊ.
- एवढं यश म्हटल्यावर एखादा कुणी वेडा झाला असता; पण मन्सूरनं सगळं सोडलं आणि एके दिवशी मुंबई सोडून, त्याचा कुत्र आणि लॅपटॉप एवढय़ा दोनच गोष्टी सोबत घेऊन तो निलगिरी पर्वतांमध्ये निघून गेला.
गेली पंधरा वर्षे मन्सूर तिथंच राहतो. त्याच्यासोबत सध्या वीसेक गायी आहेत, आणि कमीत कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त आनंदानं जगता येण्याची रहस्यं!
- मन्सूर खानच्या कुन्नूरच्या घरी जाऊन घेतलेला त्या रहस्यांचा भन्नाट शोध..