काहीच सोपं नव्हतं आणि नाही या तरुणासाठी!
ना कुटुंबातल्या हत्यांनी होरपळलेल्या बालपणाचे व्रण असलेलं व्यक्तिगत जीवन,
ना चौफेर टीकेनं आणि भाडोत्री जल्पकांनी टोचून घायाळ केलेलं राजकीय जीवन!
- पण तरी तो पाऊल रोवून उभा आहे.टिकून आहे.
अस्वस्थ वर्तमानाचा सकारात्मक ‘पर्याय’ ठरू पाहातो आहे.
गेल्या काही वर्षात देशभरात केलेल्या भ्रमंतीनं शिकवलेले धडे आणि
मनात आकार घेत असलेलं नव्या, तरुण भारताचं स्वप्न यांविषयी..
मराठीतली पहिलीवहिली आणि दिलखुलास मुलाखत