जे नाही ललाटी, ते लिहील तलाठी अशी एक म्हण आहे.
पूर्वी करवसुलीला लगान म्हणत. हल्ली तलाठ्यांना लॉगिन करावे लागते.
लगानपासून लॉगिनपर्यंत पोहोचलेल्या तलाठ्यांच्या सुखदु:खांचा सातबारा
जल, जंगल, जमीन राखण्याची जबाबदारी तलाठ्याची.
पोलीस माणसांचे संरक्षण करतात. तलाठी जमिनींचे!
जमिनीवर लक्ष ठेवायचे. जमिनीच्या भूगर्भातील खनिज
चोरीला जात असेल तर तेही पाहायचे.
नद्या, नाले सुरक्षित ठेवायचे. नद्यांतील वाळू जपायची.
वर आकाशावरही लक्ष ठेवायचे.
कारण पाऊस कमी पडला तर दुष्काळाचे पंचनामे अन्
अधिक पडला तर अतिवृष्टीचे!
आकाश आणि जमीन या मधल्या पोकळीत तलाठी भाऊसाहेब असतात.
जे दोघांकडेही नजर ठेवतात.
पण, बऱ्याचदा तेच कार्यालयावाचून निर्वासित असतात.
कायदा सुवस्थेबाबत अहवाल देण्यापासून तेनैसर्गिक आपत्तीपर्यंत बहुतांश जबाबदाऱ्या तलाठ्याकडेच!
गावातील जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा हिशेब ठेवण्याचे काम तलाठ्याचे.
पाचेक हजार खातेदारांमागे एक तलाठी. पण त्याच्या कार्यालयाचा खर्च भागवण्यासाठी
सरकार त्यांना साधी टाचणीही देत नाही.
शिव्याशापाबरोबरच कौतुकाचाही धनी ठरलेल्या तलाठ्यांची कहाणी
- सुधीर लंके