"राममंदिराच्या निर्माणाबरोबर बदलाची कात टाकण्याच्या प्रक्रियेत असलेल्या अयोध्येतले दहा दिवस"
अयोध्येत ना फार मोठे अपेक्षाभंग भेटतात. ना मोठी उमेद.
जे जसं आहे त्याचा स्वीकार.
शहर कसलं? इतिहासात मागेच राहून गेलेलं कळकट, अंधारं आणि अस्वच्छ नगरच आहे ही अयोध्या म्हणजे.
धड रस्ते नाहीत. सगळीकडे कचऱ्याचे ढीग. तो उकरुन अन्न शोधणारी माकडं.
गावभर फिरणाऱ्या , रस्त्यात विधी करणाऱ्या गाई. उघड्या वाहत्या गटारी.
सतत दुर्गंधी. जेममेम दिवे... अशी अवस्था गावाची!
हातात पैसा नाही, वाड्यातला अंधार सरत नाही, उत्पन्नाचं दुसरं साधन नाही;
पण श्रध्दा एकच, ठाकूरजी अपनी व्यवस्था खुद करते है!
पाहावी तिकडे हलाखीच अयोध्येत. पण माणसांत वखवख नाही, हाव नाही.
गरिबीतही शांत, आपल्यापुरतं, जमेल तसं, हसरं आयुष्य जगतात माणसं.
या शहराला खळाळ नाही, जसा इथल्या शरयूला नाही.
संथ. गंभीर. शांत. वाहणं फक्त आहे.
तोच अलिप्त भाव माणसांमध्येही दिसतो.
भांडूनतंटून, हक्कानं काही मागावं असं काही इथल्या माणसांच्या बोलण्यात येत नाही.
पांडेकाका सांगत होते, ‘बनबास तो रामजीका भी था, वो कटने में समय लगता है, कष्ट तो है..
अब रामजी को देखो.. उनका अपना घर अयोध्या में कितने बरस नहीं था, अब जा कर घर बनेगा..
उन्होने प्रतीक्षा की, हनुमानजीने की,
तो हम कौन है?’
मेघना ढोके / प्रशांत खरोटे